PARBHANI | राज्य सरकारने 32000 कोटीचे पॅकेज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र चार हजार पाच हजार रुपये मिळाले. त्यामुळे या दगाबाज सरकारची दगाबाजी शेतकऱ्यांसमोर आणण्यासाठी उद्धव ठाकरे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. हे सरकार दगाबाज आहे केवळ घोषणा करतो पण शेतकऱ्यांना काहीच देत नाही असे अंबादास दानवे म्हणाले.
त्याचबरोबर कर्जमाफीसाठी सरकारने जून पर्यंतची मुदत घेतली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एका झटक्यात कर्जमाफी करण्यात आली. आजही राज्यांमधील अधिकारी एवढे सक्षम आहेत की कर्जमाफीची अंमलबजावणी एका दिवसात ते करू शकतात. पण या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही केवळ वेळ काढूपणा करायचं असल्याचेही दानवे म्हणाले.
राज्यामध्ये सध्या कोणताच पक्ष स्वबळावर निवडणुका लढू शकत नाही. भाजप सरखा बलाढ्य पक्ष देखील महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातील जर महाविकास आघाडी झाली नाहीस तर मात्र शिवसेना देखील स्वबळावर लढण्यासाठी सक्षम असल्याचे दानवे म्हणाले.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा